विना सहकार नाही उध्दार।
म्हण आहे विना सहकार नाही उध्दार। सहकारी कारखानदारीचा मुळ विचार।। त्यातून पुढे जन्मला आपला स्वाहाकार। मग झाला हो सगळीकडे हाहाकार।। अपप्रवृत्ती वाढल्या,प्रगती खुंटली । सरकारने साखरेच्या एमएसपी आणि ऊसाची एफआरपी नाही जोडली।। पीएफ भरला नाही,कर्ज व्याज नाही भरले । त्याने कारखाने आजारी पडले।। आणि गेले बँकेच्या ताब्यात । शेतकरी हवालदिल, कामगार देशोधडी।। निम्मी कारखानदारी झाली खाजगी । निम्मी राहिली सहकारी अन सरकारी ।। आता सरकारने जोडली साखरेची एमएसपी आणि ऊसाची एफआरपी । इथेनॉलचा चिराग दिला हाती ।। कारखान्यांचे भविष्य इथेनॉल हाती । बगॅसचे उपपदार्थ साखर उद्योग उध्दारी।। जास्त रिकव्हरीचा ऊस लागवड करा । आधुनिकीकरणआणिऑटोमेशनकरा।। येईल कामगार, शेतकऱ्यांत समाधान। पुन्हा म्हणू विना सहकार नाही उध्दार।।